नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. दररोज लाखो रुग्ण आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थात हतबल झाली होती. आरोग्य सुविधेअभावी अनेकांना आपले प्राण गमवावा लागला. केंद्र सरकारनुसार देशात आतापर्यंत करोनाने 3 लाख 70 हजार मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र परदेशी वर्तमान पत्रांनी भारतात ४२ लाख लोकांना करोनाने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
भारतात कोरोनामुळे 42 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज न्युयॉर्क टाईम्सने आधी व्यक्त केला होता. आता इकॉनॉमिस्ट या मासिकानेही सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा सात पट अधिक मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने इकॉनॉमिस्टचा हा दावा फेटाळला असून करोना मृतांचा आकडा लपवला नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान केंद्र सरकराने इकॉनॉमिस्टचा दावा फेटाळला आहे. इकॉनॉमिस्टचे नाव न घेता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटलं की, ही माहिती खोटी आहे. हा लेख काल्पनिक आणि भ्रम पसरवणारा असून त्या आकडेवारीला काहीच आधार नसल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.