नवी दिल्ली: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोला दानवेंनी लगावला.
राज्यात दूध दरवाढीसाठी भाजप आंदोलन करणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र सरकार मदत करतच आहे,असे दानवे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दानवेंच्या टीकेला उत्तर दिल आहे. तांबे म्हणाले, “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे”