औरंगाबाद : कोरोना विषाणूचा फटका बांधकाम कामगारांना बसला आहे. लॉकडाऊन असतानादेखील जळगावच्या बांधकाम कामगारांनी सलग तीन दिवस पायी चालत आज औरंगाबाद गाठले आहे.
त्यांना आणखी सलग दोन दिवस चालल्यानंतर घर गाठता येणार आहे. शासनाने वेळोवेळी आवाहन करून देखील नागरिक स्थलांतरित होता आहेत. अनेक जण रात्री पायी प्रवास करीत असल्यामुळे अपघाताचे बळी ठरत आहेत.