पुणे – शिवसेना फुटीबाबत (Shivsena split) सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नार्वेकरांनी अद्याप या प्रकरणाबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. शिवसेनेचे प्रकरण प्रलंबित असताना राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडली आणि दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळाले. अशात या सर्व प्रकरणांवर घटनातज्ञ उल्हास बापट (ulhas bapat) यांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची (Election commision) विश्वासहर्त कमी होत चालली आहे असं उल्हास बापट त्यांनी यावेळी म्हंटले.तसेच राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीबाबत बोलताना बापट म्हणाले,”राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार की अजित पवार आहेत हे ठरवावं लागेल. कायद्याच्या दृष्टीने शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. तसेच शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तसा निर्णय आता देणार नाही असंही बापट यांनी यावेळी स्पष्ट केले. (Sharad Pawar Ajit pawar) निवडणूक आयोगाला निर्णय देताना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार. निकाल कधी लागेल हे सांगू शकत नाही, कारण दिरंगाई हा आपला मोठा दोष लोकशाही मध्ये निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव गोठवेल अशी शक्यता आहे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाऊ शकत असंही उल्हास बापट यावेळी म्हणाले. शिवसेना (Shivsena) आमदारांचे अपात्रतेची प्रकरण राहुल नार्वेकरांकडे आहे त्याबाबत बोलताना उल्हास बापट म्हणाले,”माझ्यासारखा कार्यक्षम स्पीकर किंवा निवडणूक अधिकारी असेल तर दोन महिन्यांत ही सुनावणी संपायला पाहिजे. आता चार-पाच महिने गेले आणि अजून तीन महिने नार्वेकर मागत आहेत, सात महिने जर इतका शुल्लक निर्णय घ्यायला लागत असतील तर ती एकतर अकार्यक्षमता आहे किंवा ते पक्षाच्या दबावाखाली आहे. यापैकी एक कोणतंतरी कारण असू शकतं” असं स्पष्ट मत यावेळी घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मांडले.