चिंबळी – गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व जनता हैराण झाली आहे. याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंबळी (ता. खेड) येथे केले.
चिंबळी येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच, माजी चेअरमन स्व रामचंद्र कातोरे यांचे एक महिन्यापूर्वी वद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खासदारांनी कातोरे यांच्या घरी धावटती भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, हनुमंत कातोरे, कैलास कातोरे, सचिन कातोरे, तसेच खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे माजी सभापती बाळ ठाकुर, संचालक धैर्यशील पानसरे, कैलास लिंभोरे उपस्थित होते.