मुंबई – युवक कॉंग्रेसकडून राज्यात “न्याय योजने’ची आज प्रतीकात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यभरातील सुमारे 29 हजार कुटुंबीयांना 200 रुपये देण्याची मदत आली आहे. स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना जाहीर केली होती.
युवक कॉंग्रेस राज्यातील 29 हजार कुटुंबीयांना प्रत्येकी 200 रुपये देण्यात आले आहे. न्याय योजनेच्या महिन्याच्या 6 हजार रुपयांच्या योजनेचं प्रतीकात्मक वाटप आज युवक कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.
करोनामुळे उद्भवलेल्या मंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वाधिक जनता ही घरात अडकून पडली आहे. या आर्थिक अडचणीत गोरगरिबांना मदत करण्यासाठी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एखादी योजना राबवावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील 29 हजार कुटुंबीयांना युवक कॉंग्रेसकडून 200 रुपये देण्यात आले आहेत.
दरम्यान, महिन्याला 6 हजार म्हणजेच दिवसाला 200 रुपये अशी प्रतीकात्मक मदत युवक कॉंग्रेसने दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त 21 मे रोजी ही मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.