नवी दिल्ली – काँग्रेसचे घोषणापत्र हे देशहित विरोधी असल्याची टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील जम्मू आणि काश्मीर संदर्भात केलेल्या घोषणेवर निर्मला सीतारमन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील सेनादलाला असेलेल्या विशेष अधिकार कायदा (अफस्पा) बद्दल बोलत तो हटवणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.
The AFSPA gives confidence to the security personnel. Congress is trying to dilute it, weakening internal security and demoralizing security personnel.
DM can suspend social media services in a region and Congress want to curtail this power too: Smt @nsitharaman pic.twitter.com/FeUZZeXTtO
— BJP (@BJP4India) April 3, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सैन्य दलांना विशेष अधिकार देणारा कायदा (अफस्पा) रद्द करण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर लगेचच भाजप नेत्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरुवात केली होती. अरुण जेटली, योगी आदित्यनाथ, अमित शहा यांसारख्या भाजपच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हा निवडणूक जाहीरनामा देशाचे तुकडे करणारा असल्याचे म्हंटले होते.