कर्नाटक: देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. सुरवातीला कमी बाधित असलेलं राज्य म्हणून कर्नाटक चर्चेत होत, मात्र आता कर्नाटकात सुद्धा कोरोना फोफावतोय. कर्नाटकात सोमवारी ३ हजार ६४८ नवीन रुग्ण सापडले असून आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरुप्पा यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे म्हटले आहे. येडीयुरुप्पा यांनी आज कोरोनाचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल जनतेला संबोधित केले.
येडीयुरुप्पा म्हणाले, राज्यात पाच टप्प्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत असून तज्ज्ञ मंडळींनी सुचवलेल्या 5T स्ट्रॅटजी वापरण्यात येत आहे. यामध्ये ट्रान्स, ट्रॅक, टेस्ट, ट्रेट अँड टेक्नोलॉजी, अशे पाच टप्पे आहेत. तसेच येडीयुरुप्पांनी राज्यातील हॉटस्पॉट वगळता इतर भागात लॉकडाउन नसेल, असे स्पष्ट केले.
People who came from Maharastra and Tamil Nadu added to the #COVID19 cases in Karnataka… Experts have suggested a 5T strategy – Trace, Track, Test, Treat and Technology: Karnataka CM BS Yediyurappa https://t.co/JjLwcbIgV1
— ANI (@ANI) July 21, 2020