Devendra Fadnavis : गेल्या पाच दिवसांपासून इराण-अमेरिका-इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता इतर देशांना बसण्यास सुरूवात झाली आहे. अचानक उद्धभवलेल्या या परिस्थितीमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. काहीजण सुरक्षितरित्या भारतात परतले आहेत. पण अजूनही अनेकजण दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. दुबई विमानतळानजिकच एअर स्ट्राईक झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे अकडून पडलेल्या नागरिकांचे नातवाईक काळजीत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र सरकार अकडून पडलेल्या नागरिकांसाठी नेमकं काय करत आहे, याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वय म्हणून लक्ष घालण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 2, 2026 नेमकं ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे? आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जारी सूचना जारी करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती असलेल्या पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) या देशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना दक्ष राहण्याचा सूचना तेथील भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. या दुतावासामध्ये २४ तास हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेही वाचा : संजू सॅमसनचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० विश्वचषकात ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू