मुंबई : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले,’मुंबई महाराष्ट्राची तशी भारताची आर्थिक राजधानी आहे. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या शहरात मराठी जनांसह इतर राज्यातील लोकांचाही मोठा भरणा आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाता कामा नये, यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कायदे बदलण्यासही तयार आहे.’
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,”मुंबईसह महाराष्ट्र मिळवताना १०६ जणांनी बलिदान दिलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळं मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही. मुंबईत मराठी ठसा आणि मराठी टक्का कायम राहावा यासाठी देखील आमच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की, मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये. पण जो मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत परत आणण्यासाठी यासाठी देखील पुनर्विकासाचे प्रकल्प जे थांबलेले आहेत त्यासाठी नियम कायदे बलण्यास सरकार तयार आहे, हे मी सांगू इच्छितो”असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य, उद्योग, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींची उपस्थिती होते.
पहा व्हिडिओ
वरळी, मुंबई येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२३’च्या उद्घाटन कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/LfhwMtN4sA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2023