Hrashvardhan Patil | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर प्रथमच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी आमदार राम सातपुते हे उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील भीमा नीरा नदीच्या संगमावरील प्रसिद्ध लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेत फडणवीस यांनी विधीवत पूजा, आरती केली. दरम्यान, यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले स्वागत इंदापूरात चर्चाचा विषय ठरला. फडणवीस यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने नीरा-नरसिंहपूर येथे आगमन झाल्यानंतर हेलिपॅडवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरद पवार) पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे तुळशीहार घालून विठ्ठलाची मृर्ती देऊन सत्कार केला. मंदिरातच्या आवरातच पाटील यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चाचा विषय ठरली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली. मात्र, नेमकं काय बोलणे झाले याची माहिती मिळू शकलेली नाही. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला रामराठ ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांनी पक्षाने इंदापूर विधानसभेची उमेदवारी घोषित केली. त्यांच्या विरोधात या मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली. या विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. तिरंगी लढतीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आणि येधून दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा निवडून आले. त्यानंतर भरणे यांची मंत्री पदावर वर्णी देखील लागली.