Chhagan Bhujbal । मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यात नेहमीच शाब्दिक युद्ध सुरु असते. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर निशाणा साधला. त्यानंतर जरांगे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे कूच केली. रात्रभर थांबून ते सकाळी निघणार होते. परंतु सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केले.
सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास Chhagan Bhujbal ।
छगन भुजबळ यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र भुजबळांनी, सध्या अधिवेशन आहे. मला आता तिकडे बघू द्या. जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. परंतु मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही नाटके आहेत. त्यातील एक नाटक म्हणजे गृह खात्याला जाग येते अन् दुसर नाटक म्हणजे सीमेवरून परत जा… या दोन्ही नाटकांची जुळवाजुळव करत आहे.” असे म्हणत त्यांनी जरांगे आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला
भुजबळ यांनी ज्या दोन नाटकांची नावे सांगितले त्यावरुन भुजबळ यांचा टोला कोणाला आहे, त्याची चर्चा रंगली आहे. जरांगे यांनी रविवारी ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यानंतर गृहखाते आक्रमक झाल्याचं दिसतंय. यामुळे गृह खात्याला जाग येते, असे म्हणत भुजबळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असल्याचे बोलले जातंय.
‘त्या’ नाटकांवरून राजकीय वर्तुळात चर्चा Chhagan Bhujbal ।
तसेच मनोज जरांगे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याकडे तावातावने निघाले होते. समाज बांधवांनी समजवून ते ऐकण्यास तयार नव्हते. रविवारी रात्री त्यांनी भांबेरी येथे मुक्कम केला. त्यानंतर सकाळी दहा, अकरा वाजता आपण मुंबईला जाणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. परंतु सकाळी अचानक मनोज जरांगे बॅकफूटवर आले. त्यांनी भांबेरीवरुन अंतरवाली सराटीत परत जाण्याचा निर्णय घेतला. तो संदर्भ देत भुजबळ यांनी सीमेवरुन परत जा, या नाटकाच्या उल्लेख केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीय.