वाडा -खेड तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस झाल्याने चास कमान धरण गुरुवारी (दि. 20) 78.87 टक्के भरले होते. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच 100 टक्के भरेल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वाडा परिसरात पाऊस सुरू असल्याने भाताची खाचरे पाण्याणे तुडुंब भरले आहे, त्यामुळे भाताचे पिके हिरवीगार झाली आहेत. चास कमान धरण खेड व शिरूर तालुक्याला वरदान ठरले आहे. धरणातून 3.5 मेगा व्हॅट वीज तयार केली जाते.
डावा कालवा 142 किमी शिरूर तालुक्यातील आंबळे गावापर्यंत तर उजवा कालवा 10 ते 12 किमी दोंदे परिसरापर्यंत जातो त्यामुळे कालव्या जवळील हजारो हेक्टर जमीन बागायती झाली आहे.