नवी दिल्ली : भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद राजकारणात सक्रिय होणार आहेत. आझाद यांनी रविवारी नोएडामध्ये त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली. ‘आझाद समाज पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे.
आझाद यांच्या नवीन पक्षामुळे बहुजन समाज पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. दलित राजकारणातील पोकळी आजाद यांच्या नवीन पक्षामुळे भरणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आझाद यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या नवीन पक्षामुळे उत्तर प्रदेशात एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहे. सहारनपु येथे झालेल्या झालेल्या संघर्षानंतर भीमा आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली होती.