नवी दिल्ली – मतपडताळणीचे प्रमाण वाढवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली गेल्याने पीछेहाट झाल्यानंतरही विरोधक माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठीचा लढा आम्ही सुरूच ठेऊ, असा निर्धार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी बोलून दाखवला आहे.
मतपडताळणीसाठी सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केल्यास निकालाला पाच दिवसांचा विलंब लागेल, असा भूमिका निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्राबाबूंनी काही दिवसांचाच तर विषय आहे. निवडणूक आयोगाने इतर बाबींपेक्षा विश्वासार्हता आणि पारदर्शकता यांना महत्व द्यायला हवे, असे म्हटले. याचिका दाखल करण्यात पुढाकार घेणाऱ्या विरोधकांमध्ये चंद्राबाबूंचाही समावेश होता.