जम्मू – केंद्र सरकारने कृषी आणि कृषी पुरक क्षेत्रासाठी 1 लाख 31 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे त्यातून निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्नही केंद्र सरकारकडून सुरू आहे असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलजे यांनी म्हटले आहे.
त्या जम्मू काश्मीरातील कठुआ जिल्ह्यात केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका जनसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांच्या हस्ते सुमारे सात कोटी रूपये खर्चाच्या दोन प्रकल्पांचा पायाभरणी समारंभही झाला.
यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेती पुरक अवजरांचे वाटपही करण्यात आले. शेतकऱ्यांना विविध योजनाअंतर्गत तांत्रिक आणि आर्थिक मदत दिली जात असून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठीच्या सर्व उपाययोजना सरकारतर्फे हाती घेतल्या गेल्या आहेत.
भारतातील कृषी मालाला विदेशात मोठी मागणी असून या मालाच्या निर्यातीतून शेतकरीही समृद्ध होऊ शकतो असे त्या म्हणाल्या.