CBSE 12th Result – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल ८५.२० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३.१९ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालातही यंदाही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. जगातील २७ देशांमध्ये सीबीएसईशी संलग्न शाळा आहेत. यंदा १७ लाख ८० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील १७ लाख ६८ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १५ लाख ०७ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ५७३ केंद्रांवर ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी १२० विषय होते. मुलींचा निकाल ८८.८६ टक्के तर मुलांचा निकाल ८२.१३ टक्के लागला आहे. त्रिवेन्द्रम विभागाचा निकाल सर्वात जास्त ९५.६२ टक्के एवढा लागला आहे. सर्वात कमी निकाल हा प्रयागराज विभागाचा ७२.४३ टक्के एवढा लागला आहे. एकूण ९४ हजार २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. १७ हजार ११३ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीचा वापरली. याद्वारे तब्बल ९८ लाख ६६ हजार ६२२ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन झाले. देशात कोठूनही उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन झाले. मानवी चुका टाळल्याने अचूकतेत वाढ झाली. केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक ९८.५५ टक्के असून खासगी संस्थाचा निकाल ८४.२२ टक्के एवढा आहे. शासकीय महाविद्यालयांचा निकाल ८९.५५ टक्के, शासकीय अनुदानितचा निकाल ८६.०७ टक्के एवढा आहे. पुणे विभागाचा निकाल ८७.३२ टक्के पुणे विभागाचा निकाल ८७.३२ टक्के लागला आहे. एकूण ४२ हजार ४४५ जणांनी नोंदणी केली होती. यात मुले – २२८८२, मुली – १९५६३ असे प्रमाण होते. परीक्षेसाठी एकूण ४२ हजार २८५ जण बसले होते. परीक्षेत ३६ हजार ९२३ जण उत्तीर्ण झाले. यात मुले – १९५७७, मुली – १७३४६ आहेत. मुलांचा निकाल ८५.८२ टक्के तर मुलींचा निकाल ८८.९५ टक्के लागला.