राजस्थान – २६ एप्रिल रोजी थानागाझी-अलवर बायपास रस्त्यावर ६ लोकांच्या टोळक्याने एका विवाहितेचा तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार करून त्याचे छायाचित्रण केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर निवडणुका सुरु असल्याने राजस्थान पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदर पिडीतेकडून लावण्यात आल्यानंतर राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेसवर विरोधी भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. दरम्यान या घटनेला तब्ब्ल २१ दिवस उलटल्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.
काय आहे अलवर बलात्कार प्रकरण?
२६ एप्रिल रोजी थानागाझी-अलवर बायपास रस्त्यावर तब्बल ६ लोकांच्या अज्ञात टोळक्याने पीडित महिला आणि तिच्या पतीला अडवले. यानंतर त्यांनी या दाम्पत्याला निर्जनस्थळी घेऊन जात संबंधीत दलित महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. तब्बल आठवड्यानंतर याप्रकरणी २ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतरही मुजोर आरोपींनी या घटनेची व्हिडिओ क्लीप ४ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल केली. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या ५ जणांसह व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Rajasthan: Police today filed chargesheet against six accused in connection with Alwar gangrape case. pic.twitter.com/GnyaaPuYAs
— ANI (@ANI) May 18, 2019