नवी दिल्ली: राजस्थानच्या राजधानी जयपूरमध्ये बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि इतरांविरोधात वकिलाने फिर्याद दिली आहे. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूरचे एसीपी अशोक गुप्ता यांनी ही माहिती दिली.
“कोणत्याही चाचण्याशिवाय कोरोना व्हायरस औषध विकसित केल्याचा दावा केल्याबद्दल आम्हाला बाबा रामदेव यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत”, असे गुप्ता म्हणाले.
यापूर्वी २६ जून रोजी राजस्थानच्या आरोग्य विभागाने पतंजलीच्या औषध कोरोनिल विषयी जयपूरच्या निम्स रुग्णालयात नोटीस पाठविली होती. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, या नोटीसमध्ये रुग्णालय प्रशासनाकडून पतंजलीचे औषध कोरोना विषाणूच्या रुग्णांवर वापरल्यामुळे स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
जयपूरचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.नरोत्तम शर्मा म्हणाले होते की आम्ही बुधवारी रुग्णालयाला तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. रूग्णालय प्रशासनाने सरकारला कळवले नाही आणि चाचणीसाठी कोणतीही परवानगीही मागितली नाही.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एनआयएमएस) उत्तराच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. राजस्थान सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की आयुष मंत्रालयाची मंजुरी मिळेपर्यंत कोरोनिल औषध म्हणून वापरला जाणार नाही, असे शर्मा यांनी सांगितले.