नागपूर – संविधानाचा पाया बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यांना विकासाचा विचार मांडता येत नाही. जनहीताचे कार्य करता येत नाही.
त्यामुळे केवळ लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हाच प्रयत्न 2014, 2019 आणि आता 2024 ला ते करत आहेत. आतापर्यंत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान केले. आताही त्यांनाच लोक मतदान करतील, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले.
तसेच अग्नीवीर योजना रद्द करणे म्हणजे देशाला धोक्यात टाकण्यासारखे आहे. कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितले की, आमचे सैन्य युवा ठेवलं नाही तर, आम्ही लढू शकणार नाही. आज जगाच्या पाठिवर सर्वच देशातील सैन्य युवांचं आहे.
पण आपल्या देशाच्या सैन्यात युवा नाही. त्यामुळे या अग्नीवीर योजनाला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अशा म्हणण्याला काही अर्थ नाही, अशीही टीका त्यांनी केली. तुम्हाला एक लाख पाच लाख किती लिहायचे तेवढे लिहा, पण तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 गॅरेंटी दिल्या आणि पूर्णही केल्या. पण काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेल्या गॅरेंटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिले नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.