नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत स्टूडंट्स युनियन (केएसयू) आणि बिगर आदिवासी विद्यार्थ्यात संघर्ष झाला आहे. या चकमकीनंतर मेघालय पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिलॉंग भागात कर्फ्यू लागू केला आहे. तसेच मेघालय राज्यातील सहा जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि इनर लाइन परमिट (आयएलपी) वर झालेल्या बैठकीत केएसयू कार्यकर्ते आणि बिगर आदिवासी यांच्यात झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या सहा जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद-
शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पूर्व जेंटिया हिल्स, वेस्ट जैंटिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, री भोई, पश्चिम खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये मोबाईल इंटरनेट सेवा शुक्रवारी रात्रीपासून 48 तासांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली.