अलिगढ – येथे यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले. बसमध्ये एकून 45 यात्रेकरू होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही बस कानपूरहून दिल्लीला जात होती. टप्पल परिसरात येताच चालकाच बसवरील नियंत्रण सुटले त्यामुळे बस उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बस मधील जखमींना बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेत मृत्यू पावलेल्यांबद्दल मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींना तत्काळ आणि योग्य उपचारसुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने अलीगढ़ जिले के टप्पल क्षेत्र में हुए सड़क दुर्घटना में तीन लोगों की मृत्यु पर दुख जताया और जिला प्रशासन के अधिकारियों को निर्देश दिया कि दुर्घटना में घायल हुए लोगों को उचित उपचार प्रदान किया जाए। (फ़ाइल तस्वीर) https://t.co/xII3RPxcvb pic.twitter.com/BXRnGjE5w6
— ANI_HindiNews (@AHindinews) October 10, 2020