Budget 2024 : नव्या संसदेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत. पीएम केअर रिफॉर्म योजनेतीन दरवर्षी ८ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा फायदा होतो, अशी माहिती दिली.
पुढे बोलताना अर्थमंत्री म्हणल्या,” शेतीसाठी आधुनिक साठवण करण्याकडे सरकारचा कल असेल. तसेच पुरवठा साखळीवर सरकार भर देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार असल्याचे म्हटले. यासोबतच मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाणार असल्याचे म्हटले.
सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली.
पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत दिल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे म्हटले. त्यासोबतच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. एवढेच नाही तर पीएम किसान योजनेतील घर ७० टक्के महिलांना देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.