नवी दिल्ली – देशातील करोना रुग्णांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं दिसतंय. देशातील काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असून यामुळे येथे विषाणूची दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येतंय. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान कार्यालयामध्ये एक बैठक बोलवण्यात आली आहे.
या सभेला आरोग्य सचिव राजेश भूषण हे देखील उपस्थित आहेत.
या बैठकीमध्ये देशातील करोना परिस्थितीचा व रुग्णवाढीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रुग्णवाढ नव्या स्ट्रेनमुळे? राज्यातील जनतेसाठी पुढील ३ ते ४ दिवस धाकधुकीचे
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात