Dhurandhar 2 : बहुप्रतिक्षित ‘धुरंधर रेव्हेंज‘ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांना आज मनस्तापाला सामोरे जावे लागले. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील चित्रपटगृहात पहिल्याच शोच्या वेळी नियोजित वेळेत चित्रपट सुरू न झाल्याने प्रेक्षकांनी व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले. काय घडला नेमका प्रकार? Dhurandhar 2 नियोजित वेळ: सायंकाळी ५:०० वाजता. विलंब: सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पडदा रिकामाच. दरम्यान या प्रकारानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया समोर आली असून, तासाभराच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे जाब विचारण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ तिथे तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी अडचण काय? Dhurandhar 2 मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हा शो वेळेवर सुरू होऊ शकला नाही. मात्र, मोठ्या उत्साहात चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ”आम्ही कामातून वेळ काढून चित्रपटासाठी येतो आणि तासनतास वाट पाहायला लावणे हे चुकीचे आहे,” अशी भावना संतप्त प्रेक्षकांनी व्यक्त केली. पुण्यातील सिनेरसिकांचा हा संताप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘धुरंधर’ बद्दल थोडक्यात : Dhurandhar 2 आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चा दुसरा भाग उद्या 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. पण आजपासूनच या चित्रपटाचे प्रीव्यू शोज सुरु झाले आहेत. या चित्रपटाबद्दल एक प्रचंड उत्सुक्ता आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष, हेरगिरी, अंडरवर्ल्ड आणि मुख्य म्हणजे चित्रपटाची कथा यामुळे बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. धुरंधरच्या पहिल्या पार्टने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. दुसरा भाग त्याहीपेक्षा जबरदस्त असेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर या सीक्वेलमध्ये अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.