Bollywood News । वर्ष 2005. सलमान खानचा एक चित्रपट थिएटरमध्ये आला, नाव होतं- नो एंट्री. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 74 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात सलमान खानशिवाय अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बसू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन इराणी यांनी काम केले होते. 19 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल बनवला जात आहे. मात्र यावेळी ना सलमान खान असेल ना अनिल कपूर… हा चित्रपट पूर्णपणे नवीन कलाकारांना घेऊन बनवला जाणार आहे. अनीस बज्मी आणि बोनी कपूर ‘नो एंट्री’च्या सिक्वेलसाठी एकत्र काम करत आहे. या जोडीने वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूरसोबत भाग २ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कास्टिंगमध्ये हा खूप मोठा बदल आहे. अलीकडेच, पिंकविलामध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालावरून असे दिसून आले आहे की हा चित्रपट 2024 च्या अखेरीस फ्लोरवर जाईल. त्याच वेळी, 2025 च्या अखेरीस रिलीज करण्याची योजना आहे. अलीकडच्या बातम्यांनुसार अनीस बज्मी आणि निर्माता बोनी कपूर ऑगस्टच्या मध्यापासून ‘नो एंट्री 2’ साठी कास्टिंग सुरू करतील. या सिक्वलमध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ दुहेरी भूमिकेत आहेत. हा डबल रोल भूमिकेवर आधारित चित्रपट असेल. या चित्रपटात 7 अभिनेत्री दिसणार असल्याचे बोलले जात आहे. निर्मात्यांना चित्रपटात टॉप स्टार-कास्टचा समावेश करायचा आहे. ‘नो एन्ट्री २’ च्या शूटिंगला डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.