मुंबई,- रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना आजपासून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे सदाभाऊ खोतांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पुढील आढावा समितीची बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोतांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, अशी माहिती पत्रात देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे. सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण 11 सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल.