नेवासाफाटा – नेवासा तालुक्याच्या विकासासाठी सर्वप्रथम आपण वीज, रस्ते, पाणी या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले असल्याने येत्या निवडणुकीतही नेवासा तालुक्यासाठी भाजपचाच आमदार निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासा ते नारायणवाडी या सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नारायणवाडी येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर रमेश काकडे होते. प्रल्हाद महाराज गायकवाड, देवीदास साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, रामकीसन काकडे, भाऊसाहेब खैरे,कुंडलिक दादा चिंधे, प्रताप चिंधे, नामदेव खंडागळे, जनार्धन जाधव, आबासाहेब चिंधे, प्रकाश मुळे, अशोक टेकणे, संजय काकडे, दत्तात्रय वरुडे, शैलेश पाटील, संभाजी जगताप, सरपंच राजेंद्र वाबळे, विठ्ठल डोईफोडे, रमेश रोडे, संदीप आदमने,प्रदीप रोडे, मेजर बाळासाहेब राशीनकर, मेजर रविंद्र राशीनकर, ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे युवा कार्यकर्ते संजय काकडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. यावेळी शैलेश पाटील, देविदास साळुंके, प्रताप चिंधे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारत पिटेकर, अशोक बर्डे, अनिल गायकवाड हे उपस्थित होते.