आगरतळा – त्रिपुरा राज्यातील 80 टक्के नागरिकांनी जर आपल्या घरातील भिंतीवर स्वामी विवेकानंद यांचा फोटा लावला तर भाजप पुढील 30 वर्ष सत्तेत राहिल, असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांनी केले आहे. ते आगरतळा येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडिच्या सदस्यांना
संबोधित करत होते.
बिप्लबकुमार देब पुढे म्हणाले की, माझ्या गावामध्ये मी असे पाहिले आहे की, लोक आपल्या घरात कम्युनिस्ट नेते ज्योती बसू, माओ जेडाॅन्ग यांचे फोटो लावतात.
मग आपण आपल्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो का लावू शकत नाही ? आपणही आपल्या घरात स्वामी विवेकानंदांचा फोटो लावला पाहिजे.
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचे फोटो आपण घराघरांत पोहोचवायला हवे, यामुळे आपण लोकांना प्रेरित करू शकू असेही ते म्हणाले.