Mumbai Municipal Corporation Election : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. २३ डिसेंबरपासून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, अद्यापर्यंत भाजप-शिवेसना शिंदे युतीचे मुंबई महापालिकेसाठी जागावाटप पूर्णपणे निश्चित झालेले नाही. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत मोठी रस्सीखेच सुरू असून, आता अवघ्या २० जागांचा तिढा सुटने बाकी आहे. त्यामुळे बैठकांच्या सिलसिला वाढला असून, लवकरच याबाबत निर्णय होणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात २०७ जागांवर एकमत झाले आहे. केवळ २० जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. महायुतीच्या नेत्यांची रंगशारदा येथे या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आहे. 20 जागांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा होणार आहे. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे शिंदेंची बैठक घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप १२८ जागा शिवसेना ७९ जागांवर एकमत झाले असून, ज्या २० जागांवर अंतिम शिक्कामोर्तेब होणार आहे. यातील कोणत्या जागा कोण लढविणार त्यानुसार जागांमध्ये फरक पडू शकतो. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून उर्वरित जागांवर भाजपा लढणार की शिवसेना लढणार याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले आहेत. यावरच २० जागांचा निर्णय अंतिम केला जाणार आहे. अमित साटम असेही म्हणाले आहेत की, कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नाही, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यादी जाहीर करू. त्यामुळे २० जागांवरील तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या दरबारी जाणार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी रिपब्लिकन शिवसेनेकडून मुंबईतील 17 जागांची मागणी करण्यात आली आहे. यावर काय ठरले जाणार हेही पाहणे महत्वाचे असणार आहे. ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपात पेच ठाकरे बंधूंने मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पण उबाठा आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा पेच कायम आहे. त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईतील दादर-माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडुप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा कायम असून या मतदारसंघात किमान 2 ते 3 जागा द्याव्यात, अशी मनसेची मागणी आहे. हेही वाचा : Khambatki Accident: खांबाटकी घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल ट्रकने तीन गाड्यांचा केला चक्काचूर