काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळच्या दौऱ्यावर असून नेपाळच्या प्रसिद्ध पबमध्ये राहूल गांधी दिसले आहेत असा आरोप भाजप कडून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडिओ देखील भाजपच्या नेत्यांनी शेअर केला आहे. दरम्यान त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस व राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहचान कौन ? Who are they ? pic.twitter.com/IDKBkjSg5A
— Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) May 3, 2022
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मात्र राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. असा निशाणा पूनावाला यांनी राहूल यांच्यावर साधला आहे.
पूनावाला पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष संपला, पण राहुल गांधींचा पार्टी अशीच चालेल. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशातील जनतेला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate… pic.twitter.com/dW9t07YkzC
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 3, 2022
राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहूल गांधीची खिल्ली उडवली ते म्हणाले सुट्टी, पार्टी, सहली, खाजगी परदेशी भेटी इत्यादी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत. दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा ट्विट करून म्हणाले की, हा राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय नाही. राहुल गांधी कोणासोबत आहेत? चीनच्या एजंट सोबत आहेत का? राहुल गांधींनी लष्कराविरोधात जे ट्विट केले ते चीनच्या दबावाखाली आहे का? प्रश्न विचारले जातील? कारण हा प्रश्न राहुल गांधींचा नसून देशाचा आहे. असा प्रश्न त्यांनी केला आहे.
मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. त्यांच्यात सातत्य आहे. असे ट्वीट भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी केले आहे.