मुंबई: देशभरासह राज्यातही करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. तसेच त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल आहे. “भाजप नेते फक्त तक्रारीला राज्यपालांकडे जात आहेत. त्यांना त्याशिवाय काही जमत नाही. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात”,अशी टीका थोरात यांनी केली.
भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने सर्व सांगितलं आहे. त्यामुळं सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते फडणवीस?
‘शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादे पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावे’