मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. अर्णब यांच्यावर एका ५३ वर्षीय वास्तुविशारदाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अर्णब यांना त्यांच्या मुंबईतील लोवर परेल येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आली असून अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या या कारवाईमागील हेतूबाबत देशभरातील भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ठाकरे सरकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील गोस्वामी प्रकरणावरून राज्य सरकारला सुनावले आहे.
“अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भीती”
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून भूमिका मांडताना, ‘जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येत आहे’ असा गंभीर आरोप लगावला. यावेळी त्यांनी राज्य सरकरचा निषेधही केला.
सुप्रिया सुळेंना टोला
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडबाबत निर्माण झालेल्या वादावरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना काल सुप्रिया सुळे यांनी, केंद्र सरकार राज्यांचे हक्क हिसकावून घेत देशात हळूहळू आणीबाणी लागू करतंय असा गंभीर आरोप केला होता.
अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…
सुळेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत राणे यांनी आज, ‘अर्णब गोस्वामींसारख्या सीनियर पत्रकाराला कसलीही नोटीस नसताना खेचून, मारून पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. त्यांना अपमानित करून अटक करण्यात आली. सुळे ताई ह्याला आणीबाणी म्हणतात.” असा टोला लगावला.
भाजपचे माजी खासदार संजय काकडे पत्नीसह गायब