उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
शान-ए-तिरंगा🇮🇳,
हम शर्मिंदा है 🙏 pic.twitter.com/pbM5fGAx4Y— Srinivas BV (@srinivasiyc) August 22, 2021
मागील दीड महिन्यांपासून ते आजारी होते. शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. यानंतर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. घडलेल्या या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी यावरून भाजप पक्षावर टीका केली आहे.
काँग्रे नेत्यांनी ट्विट करत टीका केली आहे की,’भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान?’ तर अनेक लोकांनी सोशलवर या घटनेचा विरोध केला आहे.