मुंबई – रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आली. अर्णब यांच्या अटकेनंतर देशभरातील भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अशातच आता भाजप नेत्यांच्या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिउत्तर देताना, ‘भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भिती
अर्णब यांच्या अटकेवरून परब यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत, “ज्याच्यामुळे एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं, त्याला वाचवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे, त्यांच्यात त्यांचा जीव अडकला आहे का? महाविकासआघाडीबाबत एवढी लोकं बोलतात, पण त्यांना आम्ही आत टाकत नाही. अर्णब यांच्या तोंडातून काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भिती आहे,” असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव
“अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं, नाईक कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर त्यांना तपासाची परवानगी दिली,” अशी माहिती परब यांनी दिली.
कोर्टाच्या आदेशाने प्रकरणाचा नव्याने तपास
“अर्णब गोस्वामी यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही, त्यांना तपासासाठी घेतलं आहे, कोर्टाच्या आदेशाने प्रकरणाचा नव्याने तपास सुरु असून राज्यात पोलिसांचं राज्य असून त्यांचंच राज्य राहील,”