Sanjeev Balyan| केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरमधील भाजपचे उमेदवार संजीव बालियान यांच्या ताफ्यावर शनिवारी 30 मार्च रोजी सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील मधकरीमपूर गावात ते एका निवडणूक कार्यक्रमानिमित्त पोहोचला होता, तिथे काही तरुणांनी दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या अपघातात ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात सध्या फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हा हल्ला सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचे संजीव बल्यान यांनी म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यात संजीव बल्यान बचावले गेले असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर या दगडफेकीत सुमारे 15 वाहनांचे नुकसान झाले असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर सैनी म्हणाले की, ”भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक हताश आणि निराश झाले आहेत. म्हणूनच ते अशा क्षुल्लक गोष्टी करत आहेत.”
नेमकं काय घडलं?
संजीव बल्यान यांचे गावचे सरपंच राकेश कुमार यांच्या मढकरीमपूर येथे घरी स्वागताचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा संजीव बालियान यांची जाहीर सभा सुरू होती. यावेळी माजी आमदार विक्रम सैनी हे भाषण करत होते. त्याचवेळी रस्त्याच्या शेजारी असलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीमुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर संजीव बल्याण यांचे समर्थक सक्रिय झाले आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शेतातून पळून गेले.
पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांचा ताफा गावातून सुखरूप बाहेर काढला. जाहीर सभेत काही समाजकंटकांकडून आधी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यातील काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. सध्या गावात संपूर्ण शांतता व सुव्यवस्था आहे. याशिवाय या संपूर्ण घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे.
कोण आहेत संजीव बालियान ?
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते संजीव बालियान हे मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे संजीव बालियान यांनी ज्येष्ठ नेते अजित सिंह यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. भाजपने पुन्हा एकदा संजीव बालियान यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा:
वाढदिवसाला ऑनलाईन केक मागवणे पडले महागात; केक खाल्यानंतर हसत्या, खेळत्या मुलीचा गेला ‘जीव