मुंबई – विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मते आहेत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला आहे. या फोनचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे, असे ते म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना 22 मते हवी आहेत. पण एवढी मते त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर आता भाजपला करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीतल्या आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन केले जात आहेत. स्विस बॅंकेत 2 वर्षांत 212 टक्के पैसे वाढले आहेत. मात्र, कॉंग्रेसला बदनाम केले जात आहे. आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहे ते सगळ्यांना माहिती आहे.
भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ठेकेदारीने सैन्यभरती करण्यात येत आहे. अग्निपथवरुन तरुण विरोधात आहे. ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे, असे नाना पटोले म्हणाले