नवी दिल्ली -जगभरातील 15 देशांमधील अनिवासी भारतीयांच्या मदतीने एक कॉल, देश के नाम अशी लोकसभा निवडणूक प्रचार मोहीम भाजपने सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर यावे, यासाठी ही मोहीम राबविली जाणार असून आठ ते दहा हजार अनिवासी भारतीय देशातही काही दिवस येऊन प्रचारात सहभागी होणार आहेत.
या मोहिमेचे काम हाताळणारे भाजप पदाधिकारी संतोष कुमार गुप्ता यांनी या उपक्रमाची माहिती पत्रकारांना दिली. मोदींच्या काळात भारताची कणखर प्रतिमा देशात तयार झाली असून हे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते पुन्हा सत्तेवर यावे, असे अनिवासी भारतीयांनाही वाटत असून ते प्रचार मोहिमेत सहभागी होणार आहेत. आपले मित्र, नातेवाईक व इतरांना व्हिडीओ कॉल करून ते मोदींचा प्रचार करतील. भाजप उमेदवारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील, असे गुप्ता यांनी सांगितले