Bihar Political Crisis : ‘राजकीय उलथापालथ आणि बिहार’ हे एकमेकांचे समानार्थी शब्द बनले आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण गेल्या काही दशकांमध्ये उत्तर भारतातील या राज्यात राजकीय चढ-उतारांचा विचार केला तर त्याच्या केंद्रस्थानी नक्कीच एक नाव आहे, ते म्हणजे नितीशकुमार. यावेळी नितीश कुमार पलटी मारतील असे कोणाला वाटले नसेल. कारण दीड वर्षापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेतानाही त्यांनी अशाच गोष्टी बोलल्या होत्या. पण मुद्दा पुणे तिथेच येऊन थांबतो तो म्हणजे ‘बिहारचे राजकारण आणि उलथापालथ’ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू बनणं.
अवघ्या ५० दिवसांत बिहारची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली. नितीशकुमार पुन्हा एकदा या उलटसुलट आघाडीचे नेतृत्व करत आहेत. ‘मला मरायला आवडेल पण एनडीएत परत जाणार नाही’, असे राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेताना नितीश कुमार यांनी म्हटले होते. मात्र 18 महिन्यांत नितीश यांनी आपल्या वाक्यावरून युटर्न घेतला आहे. त्यांचा पक्ष जेडीयू कधीही आरजेडीसोबतची युती तोडून पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या मार्गवर आहे .आता बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊ शकते.
बिहारसाठी नितीश गरजेचे आणि मजबुरी पण…
ऑगस्ट 2017 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘नितीश कुमार हे सत्तेचे लोभी आहेत. त्यांनी किती वेळा आपली भूमिका बदलली आणि खुर्चीसाठी आपली निष्ठा किती वेळा बदलली हे मी मोजू शकत नाही. ते अशा लोकांपैकी एक आहे जे आपल्या परिस्थितीनुसार त्यांची बाजू बदलतात. पण सत्य हेही आहे की नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणासाठी गरजेचे आणि मजबुरी दोन्ही आहेत. आता बिहारचे राजकारण असे झाले आहे की एकट्या नितीशकुमार यांच्याकडे फारशी राजकीय ताकद उरलेली नाही. पण जेव्हा ते एखाद्यासोबत सामील होतात तेव्हा त्या युतीची ताकद अनेक पटींनी वाढते.” असे त्यांनी म्हटले होते.
भाजपने इंडिया आघाडीच्या संथ गतीची चाचपणी केली
याचा विचार करून 28 विरोधी पक्षांनी नितीशसोबत इंडिया आघाडीची स्थापना करण्याचे मान्य केले. नितीश आणि त्यांच्या पक्षावर विश्वास ठेवला तर, काँग्रेसने त्यांना इंडिया आघाडीत पाहिजे तितके महत्त्व दिले नाही. तसेच जागा वाटपाच्या बाबतीतही नितीश आणि काँग्रेसमध्ये सर्व काही होताना दिसून आले नाही. भाजपने इंडिया आघाडीच्या युतीच्या संथ गतीची चाचपणी केली . याच दरम्यान, काँग्रेसचा प्लान नितीश कुमारांना खटकला आणि इथूनच बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय हेराफेरीची कहाणी सुरू झाली. नितीश यांना बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद हवे होते आणि भाजपचे लक्ष्य इंडिया आघाडी आणि काँग्रेस होते.
शहा-नितीश भेटीनंतर समीकरणे बदलली
खरं तर, बिहारमध्ये एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा आणि नितीश कुमार 10 डिसेंबर 2023 रोजी एकाच मंचावर एकत्र दिसले होते. सरकारी कार्यक्रमात नितीशकुमार यांनी गृहमंत्र्यांचे मनापासून स्वागत केले. या बैठकीनंतर काही दिवसांनी बिहारमध्ये अचानक राजकीय घडामोडी घडू लागल्या. 29 डिसेंबर 2023 रोजी पाटण्यापासून दूर दिल्लीत JDU ची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये लालन सिंह यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आणि नितीश कुमार यांनी कमान आपल्या हाती घेतली. हे तेच लालन सिंह होते जे जेडीयू एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत होते.
एनडीएमध्ये परतणे हा योगायोग होता की राजकीय प्रयोग?
लालन सिंह गेल्यानंतर 16 दिवसांनी नितीशकुमारांबाबत अमित शहांची भूमिका बदलली. आता नितीश कुमार एनडीएमध्ये येण्याची शक्यता नाही, हा सिद्धांत अमित शहांनी फेटाळून लावला. वास्तविक, एका मुलाखतीदरम्यान अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, जे जुने कॉम्रेड्स, जे नितीश कुमार वगैरे निघून गेले आहेत, त्यांना यायचे असेल तर मार्ग मोकळे आहेत का? राजकारणात असे होत नाही, असे उत्तर अमित शहांनी दिले. कोणाचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार केला जाईल.असे म्हणून नितीशकुमार यांच्याविषयी त्यांनी यावेळी सूचक वक्तव्य केल्याच्या चर्चा देखील त्यावेळी झाल्या.
भाजपने दोन उपमुख्यमंत्री आणि सभापतीपदाची मागणी केली
आता भाजप आणि नितीश यांच्यातील करार निश्चित झाला आहे. नितीश पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्याने बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहेत. नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने दोन उपमुख्यमंत्री आणि सभागृह अध्यक्षांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशच राहतील. या राजकीय उलथापालथीवर बिहारमधील एनडीए घटक लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी, ‘मी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी बोललो आणि आम्ही आमच्या चिंता व्यक्त केल्या. यापुढेही चर्चा सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र युतीची परिस्थिती सकारात्मक आहे.” असे त्यांनी म्हटले होते.