नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. आता पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 71 जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे.
याच पार्श्ववभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मतदारांना एक आवाहन केले आहे. देशात कोरोनाचे संकट पाहता लोकांनी करोनाच्या गाइडलाइन्सची काळजी घेत मास्कचा वापर करावा. असं मोदी म्हणाले आहे. करोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात निवडणूक होत आहे.
बिहार विधानसभा चुनावों में आज पहले दौर की वोटिंग है।
सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड संबंधी सावधानियों को बरतते हुए, लोकतंत्र के इस पर्व में अपनी हिस्सेदारी सुनिश्चित करें।
दो गज की दूरी का रखें ध्यान, मास्क जरूर पहनें।
याद रखें, पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2020
नरेंद्र मोदी आपल्या ट्विट म्हणाले कि, “बिहार विधानसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सर्व मतदारांनी कोविडसंदर्भातील सर्व ती काळजी घेत लोकशाहीच्या या पर्वात भाग घ्यावा आणि शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्कचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा, पहले मतदान, फिर जलपान’ या आशयाचे ट्विट पंतप्रधांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणूक रिंगणात असलेल्या बिहारच्या अर्धा डझन मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. बिहार निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल.