मुंबई – बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यापासून अर्चना गौतम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अर्चनाची बोलण्याची शैली बिग बॉसच्या घरात चांगलीच पसंत पडली होती. अलीकडेच अर्चनाने लाईव्ह येऊन प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अर्चनाने सांगितले होते की, ‘संदीपने तिला दोन पैशांची महिला म्हटले होते. एवढेच नाही तर संदीपने तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे अर्चनाने सांगितले होते. या प्रकरणावर बराच गदारोळ झाल्यानंतर अर्चनाच्या वडिलांनी प्रियंका गांधींच्या पीएवर कायदेशीर कारवाई केली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी संदीपविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
अर्चनाचे वडील गौतम बुद्ध सांगतात की, ‘त्यांची मुलगी अर्चना गौतम बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती, पण संदीप सिंह तिला भेटू देत नव्हते. प्रियंका गांधी यांच्या निमंत्रणावरून अर्चनाला संदीप सिंह यांनी २६ फेब्रुवारी रोजी छत्तीसगडच्या रायपूर येथे काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी बोलावले होते.’