West Bengal Election 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, निवडणूक आयोगाने राज्यातील १५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मगराहट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन विधानसभा मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे टप्पे पार पडत असतानाच, डायमंड हार्बर आणि मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या अहवालाच्या आधारे आता या १५ केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ बूथवर आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील ४ बूथवर २ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पुन्हा मतदान प्रक्रिया राबवले जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. Pratibha Chakankar : EDचा ससेमिरा! चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीकडून समन्स; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू निवडणूक आयोगाची कारवाई राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मतदानादरम्यान काही केंद्रांवर अनियमितता झाल्याचे अहवाल समोर आले होते. रिटर्निंग ऑफिसर आणि निरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे, निवडणूक आयोगाने ‘रिप्रेंझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१’ अंतर्गत या बूथवरील मतदान रद्द ठरवले. यामध्ये मगराहाट पश्चिममधील ११ आणि डायमंड हार्बरमधील ४ बूथचा समावेश आहे. (West Bengal Election 2026) Assembly Election: पुन्हा घेतलेल्या जाणाऱ्या या मतदानाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “मगराहाट पश्चिममध्ये जे घडले त्याचे आम्ही स्वागत करतो. खरं तर डायमंड हार्बर आणि फाल्टा विभागात अधिक बूथवर पुनर्मतदान व्हायला हवे होते. ही एक प्रक्रिया आहे आणि आम्ही निवडणूक आयोगाचा सन्मान करतो.” ४ मे रोजी निकाल जाहीर होणार पश्चिम बंगालमध्ये यंदा २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात विक्रमी ९२.४७ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोलकाता पोलिसांनी सात महत्त्वाच्या ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. West Bengal Election 2026 हेही वाचा: Top 10 News : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार? ते ‘या’ १५ बूथवर पुन्हा होणार मतदान; जाणून घ्या आजच्या TOP 10 News