पुणे – फळ, भाजी विभागानंतर आता भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून (दि.25) त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत गुळ भुसार बंद राहणार असल्याचे दि पूना मर्चंटसचे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना जवळच्या किराणा दुकानातूनच धान्य आणि किराणा खरेदी करावा लागणार आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशन आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. फुल बाजारही 31 मार्चपर्यंत बंद ठेवणार येणार असल्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.