शिंदे वासुली (वार्ताहर) – गेल्या कित्येक वर्षांपासून भामाआसखेड धरणग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. तर आता पुण्याला पाणी नेण्यासाठी पाइपलाइनचे काम जवळपास संपत आले असूनही धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता ‘आर या पार’ची लढाई सुरू केली आहे.
प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या इशाराप्रमाणे रविवारी (दि. 7) सायंकाळी पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरो केले होते. त्याचप्रमाणे सोमवारी (दि. 8) ही त्यांनी पुन्हा पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
प्रकल्पग्रस्त पाण्यात उभे राहून शासनाविरोधारत घोषाणाबाजी करीत आहेत. मागण्या मान्य पूर्ण होतनाही तोपर्यंत उर्वरीत एक किलोमीटरचे काम थांबवण्यात यावे, अशी माफक अपेक्षा हे धरणग्रस्त करीत आहेत. तरीही शासन आडमुठेपणाची भूमिका घेत असले तर आमचा बळी गेल्यावर त्यांना जाग येत असेल तर आम्ही मरणासाठी तयार असून यापुढील सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे.