मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कांजूरमार्ग येथील मेट्रो कार शेडबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. ‘राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे.’ असा निशाणा साधत सुळे यांनी केंद्र सरकार हळूहळू देशात आणीबाणी आंत असल्याचा गंभीर आरोप केला.
सुळे यांच्या या आरोपाला आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्याचे वृत्त रिट्विट करत भातखळकरांनी, ‘सुप्रिया सुळे यांचं खरं आहे, एकरात दहा कोटींची वांगी पिकवणारे शेतकरी, लवासात परवडणारी घरे देणारे बिल्डर टेरेसवर कोट्यवधीची कोबी लावणारे हुशार शेतकरी या सगळ्यांचेच मोदीजींनी पार वांदे करून टाकले आहेत.’ असा खोचक टोला लगावला आहे.
देशात अघोषित आणीबाणी असल्यासारखं वाटतंय; सुप्रिया सुळेंचा संताप…
खरं आहे @supriya_sule, एकरात दहा कोटींची वांगी पिकवणारे शेतकरी, लवासात परवडणारी घरे देणारे बिल्डर टेरेसवर कोट्यवधीची कोबी लावणारे हुशार शेतकरी या सगळ्यांचेच मोदीजींनी पार वांदे करून टाकले आहेत…. pic.twitter.com/SDv9VzaBoc— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 3, 2020
दरम्यान, कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही म्हटले आहे. भाजपाला मुंबईच्या विकासाच्या आड यायचं आहे आणि हा प्रकल्प रखडवायचा आहे असाही आरोप करण्यात आला.