नगर – परतीच्या पावसाने नगरजिल्ह्यात मुक्काम वाढविल्याने काही ठिकाणी शेतकऱ्य्याच्या तोंडचे पाणी पळविले आहे तर ज्याठिकाणी कोरडवाहू जमीन आहे त्याठिकाणी हरभरा ,आणि ज्वारीच्या पेरणीला वेग आला आहे.
सलग आठवडाभर पावसाने नगर जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने सोयाबीनचे पीक भिजले आहे,तर कापसाची वाढही हवामानामुळे खुंटली आहे. मक्याची अवस्थाही बिकट असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भिती
निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
बागयती जमीनित असलेल्या पिकांना हा पाऊस हानीकारक आहे, जेथेजेथे शेतात पाणी साठले असेल तेथे-तेथे पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा.शिवात कपाशीच्या पिकावर रोग पडण्याची भिती असल्याने फवारणी करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. कोरडवाही जमीनीतील पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर असल्याने हरभरा आणि ज्वारीच्या पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.