Rain alert : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर येथे जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने या भागांमध्ये थैमान घातले असून आता पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातील इतर ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाचा सर्वाधिक धोका हा मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण या भागांना वर्तविण्यात आला आहे. यामुळे राज्यात येणारे तीन दिवस अत्यंत महत्वाचे असून हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन दिवस राज्यात अलर्ट जारी केले आहेत. हवामान विभागाने २७ ते २९ सप्टेंबर या दिवसांमध्ये राज्यात अॅारेज आणि रेड अर्लट दिले आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहेत. या भागांना अॅारेंज अलर्ट दोन दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नांदेड, लातूर, बीड, हिंगोल आणि धाराशिव जिल्ह्यांना शनिवारी अॅारेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २५.३ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने नद्या नाल्यांना पूर आला आहे. पूराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतकऱ्यांची पीकं जमीनदोस्त झाली आहेत. जनजीवन पुर्वपदावर येत असताना आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये किती कुठे पाऊस झाला? लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २५.३ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड १६.९, धाराशिव ११.२, परभणी ९.९, बीड ५.४, हिंगोली ३.१, छत्रपती संभाजीनगर २.२ असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. नागरिकांना आवाहन पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. हेही वाचा : IND vs SL: टीम इंडियाने ठोकला विजयाचा षटकार! श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये केले चारीमुंड्या चीत