मुंबई -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला जितका पैसा मिळत होता, त्यापेक्षा जास्त पैसा मिळावा अशी अपेक्षा आता बीसीसीआय करत आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आगामी नवीन निविदा काढण्याचे काम जाणूनबुजून थांबविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी काळात सोनी व झी हे दोन मोठे माध्यम समूह एकमेकांत विलीन होणार आहेत, त्याचसाठी हा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचे समजत आहे. कारण हे विलीनीकरण झाले तर प्रत्येक सामन्यासाठी सध्या मिळत असलेल्या 118 कोटी रकमेपेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयला मिळणार आहे.
या दोन समूहांचे विलीनीकरण झाल्यावरच बीसीसीआय प्रक्षेपण हक्क विक्रमीच्या निविदा काढणार आहे. सध्या एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांच्या प्रेक्षकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होते, अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय टी-20 तसेच आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून जास्त रकमेचा प्रक्षेपण हक्क विक्रीचा करार करण्याचा बीसीसीआयचा उद्देश आहे.
प्रक्षेपण हक्कांच्या निविदा प्रक्रियेतील बेस प्राईसवर नव्याने काम सुरू झाले आहे. त्यामुळे हे विलीनीकरण झाल्यावर जेव्हा प्रक्षेपण कंपन्या व बीसीसीआय यांच्यात सहमती होईल तेव्हाच नवी निविदा जाहीर केली जाणार आहे. गेल्या मोसमात माध्यम हक्कांच्या विक्रीतून मायदेशातील सामन्यासाठी जवळपास 60 कोटी मूल्य होते.
त्यानंतर डिस्ने प्लस स्टारने पाच वर्षाच्या करारान्वये 103 सामन्यांसाठी 6138.1 कोटी रुपये दिले होते. बीसीसीआयला आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी मीडिया हक्कांतून 48,390 कोटी रुपये मिळाले होते. प्रती सामना 118 कोटी मिळत होते. आता जरी पाच वर्षाच्या मोसमासाठी 370 सामने असले तरी बीसीसीआय त्यात 84 ते 94 सामने वाढवण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे मायदेशातील 100 सामन्यांसाठी बीसीसीआयला जवळपास 15000 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. असे घडले तर प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीायला 150 कोटी रुपये मिळतील.
प्रत्येक वर्षी मिळालेली रक्कम
2018-19 : 46 कोटी प्रत्येक सामना
2019-20 : 47 कोटी प्रत्येक सामना
2020-21 : 46 कोटी प्रत्येक सामना
2021-22 : 77 कोटी प्रत्येक सामना
2022-23 : 78.90 कोटी प्रत्येक सामना
2023-27 : किमान 150 कोटी प्रत्येक सामना