BCCI firmly denies rumours of approaching VVS Laxman : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या सातत्याने चर्चेत आहेत. विशेषतः कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्यांच्यावर मोठी टीका होत होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० असा पराभव स्वीकारावा लागला. या ‘व्हाईट वॉश’नंतर सोशल मीडियावर आणि क्रीडा वर्तुळात गंभीरच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. लक्ष्मणला विचारणा झाल्याच्या बातम्या अफवा? काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने अनौपचारिकपणे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधून त्यांना कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, लक्ष्मण यांनी ही ऑफर नाकारली असून ते बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे (CoE) प्रमुख म्हणून काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात आले होते. या बातमीमुळे गंभीरच्या भविष्याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. बीसीसीआयचे स्पष्टीकरण – मात्र, आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘एनडीटीवी’च्या ताज्या अहवालानुसार, बीसीसीआयने भारतीय संघाच्या नेतृत्वात किंवा प्रशिक्षक पदामध्ये कोणताही बदल करण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, “आम्ही व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी औपचारिक किंवा अनौपचारिक अशा कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. बीसीसीआयचा गौतम गंभीरवर पूर्ण विश्वास आहे.” हेही वाचा – AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता २०२७ पर्यंत गंभीरचा करार – गौतम गंभीर यांचा बीसीसीआयसोबतचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, गंभीर आपला कार्यकाळ पूर्ण करतील. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (White Ball Cricket) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हेही वाचा – Navjot Singh Sidhu : ‘कसोटीमधून निवृत्ती मागे घे, तू २४ कॅरेट सोने आहेस!’, सिद्धूंची विराटसाठी भावुक पोस्ट कसोटी क्रिकेटमधील चिंता कायम – मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी दमदार असली, तरी लाल चेंडूच्या क्रिकेटमधील (Red Ball Cricket) कामगिरी बोर्डासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर कसोटी संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत असले, तरी बीसीसीआयने सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून गंभीरला पाठिंबा दर्शवला आहे.