शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर येथे जमिनीच्या वादातून झालेले खुनातील चार पैकी तीन आरोपींना पुणे तर एका आरोपीं ला मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर केला आहे.
शिरूर येथील मिळकतीच्या वादातून खुन केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी जफर उर्फ बिल्डर रहीम खान,डॉ मोहसिन नासिर पठाण, रमजान उर्फ टिपू आदम पटेल यांची में.जिल्हा न्यायालय पुणे यांनी प्रत्येकी 50 हजार रूपयांचे जामिनावर सुटका केली व तसव्वुर ऊर्फ सलमान ताहीरअली शेख यांस ना.उच्च न्यायालय,मुंबई यांनी 25 हजार रूपयांचा जामिन मंजूर केला.
त्याबाबत खटल्याची हकिकत पुढील प्रमाणे मकबुल अब्दुल रहीमान खान यांचा आरोपी व त्याच्या इतर साथिदारांनी मिळून ता.14/6/2020 रोजी राहात्या घरात खून केल्याचे आरोपावरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.
त्यामध्ये आरोपींना अटक होवुन आरोपी जफर उर्फ बिल्डर रहीम खान, डॉ मोहसिन नासिर पठाण, रमजान उर्फ टिपू आदम पटेल यांनी जामिन मिळणेबाबत जिल्हा न्यायालय पुणे येथे सुनावणी होवुन आरोपीस न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला तर आरोपी तसव्वुर ऊर्फ सलमान ताहीरअली शेख याने ना.उच्च न्यायालय मुंबई येथे जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला त्यावर न्यायमूर्ती सारंग व्हि.कोतवाल यांचे खंडपीठासामोर सुनावणी होवुन आरोपीस न्यायालयाने सश तूर्त जामिन मंजूर केला.सदर संपूर्ण प्रकरणात सर्व आरोपीं तर्फे अॅड.अभिषेक आर.अवचट व अॅड.धिरज कि.जाधव यांनी आरोपींची बाजु मांडली.